सप्तरंगीत ज्ञान-सेतू
ज्ञान प्रबोधिनीच्या EARC विभागानेसुरुकेलेल्या ‘ज्ञान सेतू’ या उपक्रमा अंतर्गत पूर्वांचल मधील अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर जाण्याचा योग आम्हाला (सौरभ, रविराज, अश्विन आणि विनायक) मिळाला.
भारतातील चार विकसनशील राज्यातील (आसाम,अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि छत्तिसगढ)
विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञानातील खेळण्याद्वारे पोहचून त्या भागाशी एक सेतू बांधणी करणे हा या उपक्रमाचा
मिळाली. १९६२ मधील भारत-चीन युध्द हे अरूणाचलच्या भूमीवर झाले. या युध्दात अनेक वीरांनी प्राण
पणाला लावून, प्रत्यक्षी प्राण अर्पून चीनशी लढा दिला. या युद्धात भारत हरला. पण अशावेळी भारताच्या
गानकोकिळा ‘लता मंगेशकर’ यांनी गायलेल्या ‘ये मेरे वतन के लोगो...’ या गाण्याने पुन्हा एकदा शक्ती आणि उत्साह सर्व भारतीयांना दिला. या सर्व घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली. म्हणून संस्कार भारती या संस्थेने
तिथे ‘सरहद को स्वरांजली’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सरहद को स्वरांजली या कार्यक्रमात पूर्वांचल मधील सात राज्ये व सिक्कीम या आठ राज्यांचा सहभाग होता.
या तीन दिवसीय कार्यक्रमाचे मुख्य स्वरूप असे होते—
• दि.२२: ये मेरे वतन के लोगो... सामुहिक व व्यक्तिगत गायन स्पर्धा.
• दि.२३: पहाटे ५:४२ पासून दुसाऱ्या दिवशी पहाटे ५.४२ पर्यंत (२४ तास) आठ राज्यांचे संस्कृतीक कार्यक्रम.
• दि.२४: ये मेरे वतन के लोगो... गाण्याची सुमारे १००० विद्यार्थ्यांचे सामुहिक गायन व प्रकट कार्यक्रम.
आठ राज्यांतून आलेल्या अनेक छोट्या- मोठ्यांनी गायन स्पर्धेत सहभाग नोंदवला. ये मेरे वतन के लोगो... या
गाण्याने इंदिरा गांधी उद्यान व इटानगर हे भारावून गेले होते. संगीताच्या शक्तीने एक देशभक्तीची लहर तयार झाली होती. अरुणाचलच्या थंडगार हवेमध्ये देशभक्तीने एक उबदार वातवरण तयार झाले होते.
दि.२३ चा चोवीस तासांचा सांस्कृतिक कार्यक्रम हा संपूर्ण पूर्वांचलचा सुंदर संगम होता. सात रंगाच्या विविध
नद्यांनी एका ठिकाणी एकत्र आल्यावर जे सुंदर दृश्य असेल ते आम्हाला पहायला मिळाले. सात रंग हे फक्त
त्यांच्या रंगेबीरंगी दागिने व पोशाखांचे नाही तर भाषा, वाद्य, संगीत, विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि
वैचारिक देखील होते. या कार्यक्रमात भारतातील विविध प्रसिद्ध कलावंतांनी आपल्या कलेनी इटानगरला
मंत्रमुग्ध केले. त्यामध्ये प्रसिद्ध चित्रकार, गायक यांचा सामावेश होता. उस्ताद नाफिसुद्दिन डागर व त्यांचे
बंधूनी मिळून सर्व शहीद जवानांना आपल्या स्वरांनी स्वरांजली अर्पण केली.
शेवटच्या दिवशी म्हणजे दि.२४ ला प्रकट कार्यक्रमामध्ये सर्व बालकांचा चाहता ‘शक्तिमान’ म्हणजे मुकेश
खन्ना, अरुणाचलप्रदेशचे मुख्यमंत्री नाबाम तुकी उपस्थित होते. या कार्यक्रमात शक्तीमानने आपल्या वाणीने
सर्व विद्यार्थ्यांची मनं जिंकली आणि सर्व जवानांना कृतज्ञतेने श्रद्धांजली अर्पण केली. ९४ वर्षीय लीलावती या
शहीद जसवंत सिंगच्या आई या कार्यक्रमात उपस्थित होत्या. त्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानचिन्ह
देवून सन्मानित करण्यात आले. असे सन्मानचिन्ह सर्व शहीद जवानांच्या घरी पोहचावण्याचा उपक्रम
संस्कार भारतीने हाती घेतला आहे. याचवेळी १००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येवून सामुहिक ‘ये मेरे
वतन के लोगो...’ हे गीत गायले. व ३०० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे एक शीर्षकगान कृतीगानातून सादर
केले.
या कार्यक्रमात विविध संस्थांचे स्टॉल लावण्याची संधी होती. आम्ही ‘ज्ञान सेतू’ चा देखील एक स्टॉल लावला
होता. विज्ञान कचऱ्यातून बनलेल्या खेळण्या पासून देखील शिकता येते. अशा खेळण्यातून, प्रयोगातून
मुलभूत वैज्ञानिक तत्व शिकणे अधिक आनंददायी असते याचा अनुभव लहान-मोठे सर्वजन घेत होते. या दोन
दिवसात एक हजारापेक्षा अधिकांनी भेट दिली. कित्येकांनी हा उपक्रम त्यांच्या राज्यात, भागात घ्यावा असे
सुचवले. असे फक्त सुचवलेच नाही तर जबाबदारी घेण्यासाठी हात देखील पुढे आले. या दरम्यान स्पर्श करून
जाणारा अनुभव म्हणजे लहान-मोठ्यांच्या चेहऱ्यावर येणारे आश्चर्य भाव व त्या जादुई खेळण्याच्या मागे
काही वैज्ञानिक तत्व आहे हे जाणल्या नंतर आकाशाला गवसणी घातल्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. या
स्वरांजलीच्या स्वरात भिजण्याची संधी मिळाली. ज्यांच्यामुळे आपण सर्व सुरक्षित राहून विकास साधू
शकतो, सहज अभिव्यक्ती करू शकतो अशा जवानांना कृतीशील, कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्याची
संधी आम्हाला मिळाली. जसा ‘ज्ञान सेतू‘ बाहेरच्या जगात बांधला गेला, व्यापक झाला. त्याचा प्रमाणे आत
देखील आपण एका मोठ्या संस्कृतीचे, समाजाचे, तेथील प्रश्नांचे भाग आहोत...याचे देखील सेतू बंधन सुरु
झाले.
ज्ञान प्रबोधिनीच्या EARC विभागानेसुरुकेलेल्या ‘ज्ञान सेतू’ या उपक्रमा अंतर्गत पूर्वांचल मधील अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर जाण्याचा योग आम्हाला (सौरभ, रविराज, अश्विन आणि विनायक) मिळाला.
भारतातील चार विकसनशील राज्यातील (आसाम,अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि छत्तिसगढ)
विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञानातील खेळण्याद्वारे पोहचून त्या भागाशी एक सेतू बांधणी करणे हा या उपक्रमाचा
उद्देश आहे.
आम्ही इटानगर मध्ये असतानाच तेथे एका भव्य-दिव्य अशा कार्यक्रमात सामील होण्याची संधी आम्हालामिळाली. १९६२ मधील भारत-चीन युध्द हे अरूणाचलच्या भूमीवर झाले. या युध्दात अनेक वीरांनी प्राण
पणाला लावून, प्रत्यक्षी प्राण अर्पून चीनशी लढा दिला. या युद्धात भारत हरला. पण अशावेळी भारताच्या
गानकोकिळा ‘लता मंगेशकर’ यांनी गायलेल्या ‘ये मेरे वतन के लोगो...’ या गाण्याने पुन्हा एकदा शक्ती आणि उत्साह सर्व भारतीयांना दिला. या सर्व घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली. म्हणून संस्कार भारती या संस्थेने
तिथे ‘सरहद को स्वरांजली’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सरहद को स्वरांजली या कार्यक्रमात पूर्वांचल मधील सात राज्ये व सिक्कीम या आठ राज्यांचा सहभाग होता.
या तीन दिवसीय कार्यक्रमाचे मुख्य स्वरूप असे होते—
• दि.२२: ये मेरे वतन के लोगो... सामुहिक व व्यक्तिगत गायन स्पर्धा.
• दि.२३: पहाटे ५:४२ पासून दुसाऱ्या दिवशी पहाटे ५.४२ पर्यंत (२४ तास) आठ राज्यांचे संस्कृतीक कार्यक्रम.
• दि.२४: ये मेरे वतन के लोगो... गाण्याची सुमारे १००० विद्यार्थ्यांचे सामुहिक गायन व प्रकट कार्यक्रम.
आठ राज्यांतून आलेल्या अनेक छोट्या- मोठ्यांनी गायन स्पर्धेत सहभाग नोंदवला. ये मेरे वतन के लोगो... या
गाण्याने इंदिरा गांधी उद्यान व इटानगर हे भारावून गेले होते. संगीताच्या शक्तीने एक देशभक्तीची लहर तयार झाली होती. अरुणाचलच्या थंडगार हवेमध्ये देशभक्तीने एक उबदार वातवरण तयार झाले होते.
दि.२३ चा चोवीस तासांचा सांस्कृतिक कार्यक्रम हा संपूर्ण पूर्वांचलचा सुंदर संगम होता. सात रंगाच्या विविध
नद्यांनी एका ठिकाणी एकत्र आल्यावर जे सुंदर दृश्य असेल ते आम्हाला पहायला मिळाले. सात रंग हे फक्त
त्यांच्या रंगेबीरंगी दागिने व पोशाखांचे नाही तर भाषा, वाद्य, संगीत, विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि
वैचारिक देखील होते. या कार्यक्रमात भारतातील विविध प्रसिद्ध कलावंतांनी आपल्या कलेनी इटानगरला
मंत्रमुग्ध केले. त्यामध्ये प्रसिद्ध चित्रकार, गायक यांचा सामावेश होता. उस्ताद नाफिसुद्दिन डागर व त्यांचे
बंधूनी मिळून सर्व शहीद जवानांना आपल्या स्वरांनी स्वरांजली अर्पण केली.
शेवटच्या दिवशी म्हणजे दि.२४ ला प्रकट कार्यक्रमामध्ये सर्व बालकांचा चाहता ‘शक्तिमान’ म्हणजे मुकेश
खन्ना, अरुणाचलप्रदेशचे मुख्यमंत्री नाबाम तुकी उपस्थित होते. या कार्यक्रमात शक्तीमानने आपल्या वाणीने
सर्व विद्यार्थ्यांची मनं जिंकली आणि सर्व जवानांना कृतज्ञतेने श्रद्धांजली अर्पण केली. ९४ वर्षीय लीलावती या
शहीद जसवंत सिंगच्या आई या कार्यक्रमात उपस्थित होत्या. त्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानचिन्ह
देवून सन्मानित करण्यात आले. असे सन्मानचिन्ह सर्व शहीद जवानांच्या घरी पोहचावण्याचा उपक्रम
संस्कार भारतीने हाती घेतला आहे. याचवेळी १००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येवून सामुहिक ‘ये मेरे
वतन के लोगो...’ हे गीत गायले. व ३०० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे एक शीर्षकगान कृतीगानातून सादर
केले.
या कार्यक्रमात विविध संस्थांचे स्टॉल लावण्याची संधी होती. आम्ही ‘ज्ञान सेतू’ चा देखील एक स्टॉल लावला
होता. विज्ञान कचऱ्यातून बनलेल्या खेळण्या पासून देखील शिकता येते. अशा खेळण्यातून, प्रयोगातून
मुलभूत वैज्ञानिक तत्व शिकणे अधिक आनंददायी असते याचा अनुभव लहान-मोठे सर्वजन घेत होते. या दोन
दिवसात एक हजारापेक्षा अधिकांनी भेट दिली. कित्येकांनी हा उपक्रम त्यांच्या राज्यात, भागात घ्यावा असे
सुचवले. असे फक्त सुचवलेच नाही तर जबाबदारी घेण्यासाठी हात देखील पुढे आले. या दरम्यान स्पर्श करून
जाणारा अनुभव म्हणजे लहान-मोठ्यांच्या चेहऱ्यावर येणारे आश्चर्य भाव व त्या जादुई खेळण्याच्या मागे
काही वैज्ञानिक तत्व आहे हे जाणल्या नंतर आकाशाला गवसणी घातल्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. या
स्वरांजलीच्या स्वरात भिजण्याची संधी मिळाली. ज्यांच्यामुळे आपण सर्व सुरक्षित राहून विकास साधू
शकतो, सहज अभिव्यक्ती करू शकतो अशा जवानांना कृतीशील, कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्याची
संधी आम्हाला मिळाली. जसा ‘ज्ञान सेतू‘ बाहेरच्या जगात बांधला गेला, व्यापक झाला. त्याचा प्रमाणे आत
देखील आपण एका मोठ्या संस्कृतीचे, समाजाचे, तेथील प्रश्नांचे भाग आहोत...याचे देखील सेतू बंधन सुरु
झाले.




