Saturday, December 7, 2013

सप्तरंगीत ज्ञान-सेतू आणि ‘सरहद को स्वरांजली’

                                                          सप्तरंगीत ज्ञान-सेतू


ज्ञान प्रबोधिनीच्या EARC विभागानेसुरुकेलेल्या ‘ज्ञान सेतू’ या उपक्रमा अंतर्गत पूर्वांचल मधील अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर जाण्याचा योग आम्हाला (सौरभ, रविराज, अश्विन आणि विनायक) मिळाला.
भारतातील चार विकसनशील राज्यातील (आसाम,अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि छत्तिसगढ)
 विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञानातील खेळण्याद्वारे पोहचून त्या भागाशी एक सेतू बांधणी करणे हा या उपक्रमाचा
उद्देश आहे.
आम्ही इटानगर मध्ये असतानाच तेथे एका भव्य-दिव्य अशा कार्यक्रमात सामील होण्याची संधी आम्हाला
मिळाली. १९६२ मधील भारत-चीन युध्द हे अरूणाचलच्या भूमीवर झाले. या युध्दात अनेक वीरांनी प्राण
पणाला लावून, प्रत्यक्षी प्राण अर्पून चीनशी लढा दिला. या युद्धात भारत हरला. पण अशावेळी भारताच्या
गानकोकिळा ‘लता मंगेशकर’ यांनी गायलेल्या ‘ये मेरे वतन के लोगो...’ या गाण्याने पुन्हा एकदा शक्ती आणि उत्साह सर्व भारतीयांना दिला. या सर्व घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली. म्हणून संस्कार भारती या संस्थेने
तिथे ‘सरहद को स्वरांजली’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सरहद को स्वरांजली या कार्यक्रमात पूर्वांचल मधील सात राज्ये व सिक्कीम या आठ राज्यांचा सहभाग होता.

या तीन दिवसीय कार्यक्रमाचे मुख्य स्वरूप असे होते—

• दि.२२: ये मेरे वतन के लोगो... सामुहिक व व्यक्तिगत गायन स्पर्धा.
• दि.२३: पहाटे ५:४२ पासून दुसाऱ्या दिवशी पहाटे ५.४२ पर्यंत (२४ तास) आठ राज्यांचे संस्कृतीक कार्यक्रम.
• दि.२४: ये मेरे वतन के लोगो... गाण्याची सुमारे १००० विद्यार्थ्यांचे सामुहिक गायन व प्रकट कार्यक्रम.

आठ राज्यांतून आलेल्या अनेक छोट्या- मोठ्यांनी गायन स्पर्धेत सहभाग नोंदवला. ये मेरे वतन के लोगो... या
गाण्याने इंदिरा गांधी उद्यान व इटानगर हे भारावून गेले होते. संगीताच्या शक्तीने एक देशभक्तीची लहर तयार झाली होती. अरुणाचलच्या थंडगार हवेमध्ये देशभक्तीने एक उबदार वातवरण तयार झाले होते.
दि.२३ चा चोवीस तासांचा सांस्कृतिक कार्यक्रम हा संपूर्ण पूर्वांचलचा सुंदर संगम होता. सात रंगाच्या विविध
नद्यांनी एका ठिकाणी एकत्र आल्यावर जे सुंदर दृश्य असेल ते आम्हाला पहायला मिळाले. सात रंग हे फक्त
त्यांच्या रंगेबीरंगी दागिने व पोशाखांचे नाही तर भाषा, वाद्य, संगीत, विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि
वैचारिक देखील होते. या कार्यक्रमात भारतातील विविध प्रसिद्ध कलावंतांनी आपल्या कलेनी इटानगरला
मंत्रमुग्ध केले. त्यामध्ये प्रसिद्ध चित्रकार, गायक यांचा सामावेश होता. उस्ताद नाफिसुद्दिन डागर व त्यांचे
बंधूनी मिळून सर्व शहीद जवानांना आपल्या स्वरांनी स्वरांजली अर्पण केली.

शेवटच्या दिवशी म्हणजे दि.२४ ला प्रकट कार्यक्रमामध्ये सर्व बालकांचा चाहता ‘शक्तिमान’ म्हणजे मुकेश
खन्ना, अरुणाचलप्रदेशचे मुख्यमंत्री नाबाम तुकी उपस्थित होते. या कार्यक्रमात शक्तीमानने आपल्या वाणीने
सर्व विद्यार्थ्यांची मनं जिंकली आणि सर्व जवानांना कृतज्ञतेने श्रद्धांजली अर्पण केली. ९४ वर्षीय लीलावती या
शहीद जसवंत सिंगच्या आई या कार्यक्रमात उपस्थित होत्या. त्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानचिन्ह
देवून सन्मानित करण्यात आले. असे सन्मानचिन्ह सर्व शहीद जवानांच्या घरी पोहचावण्याचा उपक्रम
संस्कार भारतीने हाती घेतला आहे. याचवेळी १००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येवून सामुहिक ‘ये मेरे
वतन के लोगो...’ हे गीत गायले. व ३०० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे एक शीर्षकगान कृतीगानातून सादर
केले.



या कार्यक्रमात विविध संस्थांचे स्टॉल लावण्याची संधी होती. आम्ही ‘ज्ञान सेतू’ चा देखील एक स्टॉल लावला
होता. विज्ञान कचऱ्यातून बनलेल्या खेळण्या पासून देखील शिकता येते. अशा खेळण्यातून, प्रयोगातून
मुलभूत वैज्ञानिक तत्व शिकणे अधिक आनंददायी असते याचा अनुभव लहान-मोठे सर्वजन घेत होते. या दोन
 दिवसात एक हजारापेक्षा अधिकांनी भेट दिली. कित्येकांनी हा उपक्रम त्यांच्या राज्यात, भागात घ्यावा असे
सुचवले. असे फक्त सुचवलेच नाही तर जबाबदारी घेण्यासाठी हात देखील पुढे आले. या दरम्यान स्पर्श करून
 जाणारा अनुभव म्हणजे लहान-मोठ्यांच्या चेहऱ्यावर येणारे आश्चर्य भाव व त्या जादुई खेळण्याच्या मागे
काही वैज्ञानिक तत्व आहे हे जाणल्या नंतर आकाशाला गवसणी घातल्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. या
स्वरांजलीच्या स्वरात भिजण्याची संधी मिळाली. ज्यांच्यामुळे आपण सर्व सुरक्षित राहून विकास साधू
शकतो, सहज अभिव्यक्ती करू शकतो अशा जवानांना कृतीशील, कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्याची
संधी आम्हाला मिळाली. जसा ‘ज्ञान सेतू‘ बाहेरच्या जगात बांधला गेला, व्यापक झाला. त्याचा प्रमाणे आत
 देखील आपण एका मोठ्या संस्कृतीचे, समाजाचे, तेथील प्रश्नांचे भाग आहोत...याचे देखील सेतू बंधन सुरु
झाले.


Friday, November 29, 2013

Sarhad ko Swaranjali


                                                     Sarhad ko Swaranjali



Nov 19, 7:02 pm


Itanagar, Nov. 19 (ANI): Ninety-year-old Leela Devi, the mother of martyred rif leman Jaswant Singh
Rawat, has said she would lead the Sharhad ko Swaranajali f unction at the Indira Gandhi Park here on
November 24.
Devi, accompanied by her relatives Vijay Singh Rawat, 58, Madhubala, 47 and Amit Rawat, 23, would arrive here on November 24 f rom Dehradun. They would f ly to Guwahati and a special helicopter would then bring them to Itanagar, according to organising committee president Kipa Babu.
Every word of the proud mother would be a louder message f or the soldiers serving the motherland in
harshest co ndition along the Indo-China border and boost their morale to continue their duty. It would be
rarest occasion when the mother salutes her brave son who sacrif iced his lif e 51 years ago.
Besides the proud mother of Rawat, who had changed the course of 1962 Chinese aggression by halting
the advance of Chinese soldiers f or 72 hours bef ore sacrif icing his lif e, Shaktiman f amed Mukesh Khanna,Lt Gen (retd) G M Patil who was posted in Tawang during the war, f lutists Rajendra Prasanna and PanditKetan Joshi, besides Chanaykya serial producer Chandra Prakash Dwivedi, Hindustani classical exponent Nagraj Havaldar, Dagar Bandhu Nasif f udin and Hanif uddin, painter and singer Satya Narayan Maurya, Manipuri bamboo dance expert Gauri Kishore Sarma, Bhojpuri singer Manoj Tiwari, world-known portrait expert Basudev Kamat and cine artist Pranjal Saikia, 600 representatives f rom seven north east states, about 10,000 locals, including 400 dancers and singers of host state would take part in the mega event to begin at 10. 30a.m. to pay rich tributes to the brave hearts who had sacrif iced their lives while guarding the f rontier.
'Ae Mere Watan Ke Logon', the chorus by 10,000 students would rent the air besides numerous patriotic
programmes as part of the event, organised by Sanskar Bhrati Poorvotar.
______________________________________________________________________________________



ITANAGAR, Nov 24:
Arunachal Pradesh is the nation's “sentinel of the east”, and its people are patriotic and “jealously guarding
the territorial integrity of the country”, Chief Minister Nabam Tuki said today.
“Sitting on the lap of the Himalayas, we are the f irst to resist any f orce against India. If any enemy eyes
India through North East, Arunachal Pradesh will stand against it f irst, like in the 1962 Sino-India war,” he
told the valedictory programme of the three-day 'Sarhad ko Swaranjali' organized by North East unit of
Sansakar Bharati at Indira Gandhi Park here.
Tuki announced that the Government would set-up a Martyrs’ Memorial in the state capital Itanagar in
memory of those soldiers killed while f ighting the invading Chinese army in 1962. He said Itanagar, which
was established as the state capital af ter 1962, owes its respect to the Martyrs who sacrif iced their lives
f or the sovereignty of the country and territorial integrity of Arunachal Pradesh.
Tuki paid rich tributes to the martyrs of the 1962 war and acknowledged the exemplary services rendered by
the Indian soldiers along the international boundaries that the state shares with neighboring countries. He
remembered martyr Jaswant Singh Rawat, hero of the Indo-China war, as a true son of the soil and said
Arunachal Pradesh as well as the whole country will always remain gratef ul f or his ultimate sacrif ice.
Felicitating wheel-chair bound Leela Devi, 94- year-old mother of martyr Jaswant Singh, who came all the
way f rom Dehradun to attend the programme as the Chief Guest, Tuki expressed gratef ulness on behalf of
the people of the state.
“Your setting f oot on the soil of Arunachal Pradesh has f urthered the sanctity of the land of the dawnlitmountains,where your brave son laid down his lif e f ighting the enemy. I salute the mother, who sacrif icedher beloved son f or this land,” he said.

Friday, November 8, 2013

Bharat Mera Ghar



Bharat Mera Ghar
Bharat Mera Ghar , a tour programme for teachers from Arunachal Pradesh was successfully concluded at Guwahati  on 8th November, 2013. As a part of National Integration, some of our Arunachalee brothers and sisters used to go to other states and experience all-round development of the states every year through a tour programme named Bharat Mera Ghar (B.M.G.).
This year B.M.G. was organized for teachers specially to study various educational experiments done in Maharashtra. A group of 23 teachers from 9 districts of Arunachal Pradesh visited Mumbai, Pune and Nagpur from 28th October to 8th November, 2013.
The group first reached to Mumbai where they get a warm welcome from Mumbaikars. The group visited Elephanta caves, Pagoda, Gateway of India and Juhu beach. The teachers visited Keshav Srushti where they learnt about medicinal plants, what type of project s the students used to work on.
 At Pune, a training programme was organized at Jnana Prabodhini, a reknown Institute working on gifted children. Sessions on Geography and History by Dr.Manoj Devane helped the group to clear the basic concepts as well as various tools and methodologies which should be used by taking benefits of local surroundings.     Heritage walk,  a morning walk in Central Pune conducted by Shri. Mohan Shete brought back the live memories of freedom fighters like Veer Savarkar, Lokmanya Tilak, Chaphekar Bandhu, Hutatma Rajguru, M.N. Roy by visiting their residences. At ‘Bharat  Itihas Samshodhan Mandal’, the teachers recognized the importance of keeping History in written form.
The group was also trained in Play-way methods, Child psychology, enhancing intelligence through games and communication skills for teachers by Dr.Sujala Watve , Dr.Vanita Patwardhan and faculty members of Jnana Prabodhinin’s Institute of Psychology .
The group gained an advantage of sharing and discussing ‘Educational Scenario’ in Arunachal Pradesh for 3 days with Shri.Vishwas Lapalkar, Life worker of Vivekananda Kendra  and Vivek Ponkshe, Secretary, Educational wing of Jnana Prabodhini .Both  Vishwasji and Vivekji have  long association with educational and  development  activities in Arunachal Pradesh .
 Lastly, the group visited the RSS headquarter at Nagpur where the group visited the birthplace of Dr. Keshav Hedgewar. The group also visited social projects run by RSS and its sister organizations like Hedgewar Blood Bank, Goshala Prakalp, Vivekananda Hospital run at tribal belt in Maharashtra. By seeing the Goshala Prakalp, the group came to know the number of medicinal uses of Gomutra as well as why our culture believe cow as ‘Gomata’. The group also visited ‘Dikshbhumi ‘where they saw the photo gallery of Dr. Babasaheb Ambedkar. 
Each teacher went to different houses for lunch and to celebrate Diwali Festival at Pune and Nagpur. In all, the group feels the tour educative, entertaining, and experiencing and Country loving Tour. The group feel it proudly Bharat Mera Ghar.


Bharat Mata Ki Jay !!

Saturday, October 12, 2013

समानी व आकूति: समाना हृदयानि व:|



समानी व आकूति: समाना हृदयानि व:|


गेल्या आठवड्यात केतकी आपटेने पाठवलेली एक लिंक पाहत होतो . जॉन विल्सन वाद्यवृंदाने टाँम अँड जेरी मालिकेसाठी तयार केलेल्या सुरावटीचे सादरीकरण होते. सुरावट व त्याचे सादरीकरण उत्तम होतेच पण त्याबरोबर ते पाचपन्नास वादक ज्या एकतानतेने , सुसूत्रतेने काम करत होते ते देखिल पाहण्यासारखे होते. एखादा वादक जेव्हा  वादन  करतो तेव्हा त्याच्या शारीरिक ,बौद्धिक ,मानसिक क्रियात जी सुसूत्रता लागते तीच सुसूत्रता; तोच समन्वय सामुहिक सादरीकरणात  असावा लागतो . जणू एक व्यक्ती एक शरीर काम करत आहे अशी एकजीवता वादकात निर्माण झाल्याशिवाय उत्तम सादरीकरण प्रकट होणे शक्य नाही. पाश्चात्य वाद्यवृन्दाचे ५०-५० व्हायोलीनचे सादरीकरण ही  एकजीवता, एकरूपता ,एकतानता , ते ऐक्य अनुभवण्यासाठी जरूर पाहावेत.
 .
          असे समूहमन तयार होणे शक्य आहे ? ते कसे होते ? 
 .
असे समूहमन  खरेतर सहज तयार होते आपण रोजच्या जीवनात  त्याचा अनुभव घेतो . खचाखच भरलेली  बस जेव्हा बसस्टाँपवर  येते तेव्हा आतील लोकांचे एक समूहमन तयार होते, ते आत कमी माणसे येतील याची काळजी घेत असते तर बाहेरच्या लोकांचे समूहमन  आपण आत कसा प्रवेश करू याची काळजी घेते. रस्त्यावर भांडणे होतात तेव्हा असेच समूहमन तयार होतो. 
एकत्र येण्याचे निमित्त काय ? हि विचार करण्याची गोष्ट आहे .त्या गर्दीला ...त्या समूहाला काय सध्या करायचे आहे ....त्यांचे उद्दिष्ट काय आहे . ते समान उद्दिष्टाने एकत्र आले आहेत का ? 
 .
पुण्यात दसऱ्यानंतर  एका उद्दिष्टाने एकत्र आलेल्याची मोठी गर्दी लक्ष्मी रस्त्यावर ;तुळशीबागेत गोळा होईल . सर्वाचे उद्दिष्ट एकच असणार आहे खरेदी करणे .
असा समुह आणि दोन महिन्यांपूर्वी वारीच्या वेळी अनुभवलेला एका उद्दिष्टाने एकत्र आलेला वारकरयांचा समूह !
.
           एकत्र येण्याचे निमित्त काय ? सध्या काय ?  यानुसार समूहशक्तीचे प्रगटीकरण   होणार .एका विधायक उद्दिष्टाने एखादा मोर्च्या निघतो हजारो नागरिक त्याच्यात समाविष्ट होतात एक सामुहिक  ताकद प्रगट होते पण त्या समुहातील सदस्यांच्या मनात साध्य ...साधन स्पष्ट नसेल तर मोर्च्यातील एखादा सदस्य एक दगड उचलतो आणि क्षणार्धात त्या समुहशक्तीचे रुपांतर विध्वंस ,जाळपोळ करणाऱ्या टोळीत होते. 
.
एक कथा आठवते . चाफळला समर्थांनी रामनवमीचा उत्सव सुरु केला. पंचक्रोशीतील हजारो नागरिक उत्सवासाठी एकत्र जमू लागले. सुलतानांच्या जुलमी राजवटीच्या भयातून मुक्त झालेले नागरिक एकत्र जमत होते . एके वर्षी  उत्सवाचा दिवस जवळ आला तरी शिवाजी महाराजांकडून येणारी मदत पोचली नव्हती. रामनवमीच्या दिवशी जमणारया हजारो भक्तांसाठी  प्रसादाची व्यवस्था कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला . श्री समर्थांनी रामाची आराधना  केली आणि एका रात्रीत धान्य कोठारे धान्याने भरून गेली . यातील चमत्कारावर नीट विचार केला तर त्याचे उत्तर भिक्षेत सापडते . घरटी माणशी एक मुठ धान्य गोळा केले  तर एका रात्रीत धन्य कोठार धान्याने भरणे आवघड नाही. 
.
आजही आपण सज्जनगडावर गेल्यावर जो प्रसाद घेतो त्यासाठी लागणारे धान्य गावोगाव फिरून गोळा केलेल्या भिक्षेतून जमा होते . महाराष्ट्रातील अनेक यात्रांमध्ये प्रसादाच्या  भाकरी घराघरातून गोळा केल्या जातात  ;आचारी न नेमता लोकसहभागातून हजारोंना जेवायला वाढले जाते. स्वाध्याय परिवार ,निरंकारी परिवार अशांचे मेळावे समूहशक्तीच्या प्रगटी करणातून कामे  कंत्राटी न देता  पार पडतात . 
.
‘मराठा तितुका मेळवावा’ हा मंत्र समर्थांच्या अनुभवांची प्रचिती आहे.  
.
समूहाने एक दिलाने काम करायचे असेल तर तेथे निर्मितीची प्रेरणा असावी लागते. भगवान श्री कृष्णाने अशी प्रगतीसाठी आवश्यक गो संवर्धनाची प्रेरणा गोपालांमध्ये निर्माण केली . त्यांना एका उद्दिष्टाने मेळवले आणि गोपालक समाज निर्मितीचा गोवर्धन लीलया उचलला गेला . समाज  एका उद्दिष्टाने मेळवला तर भगवंत करंगळी एवढा; अधिष्ठान म्हणून  पुरतो . त्या गोवर्धानाच्या  चित्रातील गोपालांमध्ये निर्माण केलेली समूहशक्ती ,समूहा प्रेरणा पाहता आली पाहिजे .
.
‘मराठा तितुका मेळवावा’ हा मंत्र शिवाजी महाराजांनी संघटनेसाठी वापरला.मराठी जनतेत  निर्माण झालेली शक्ती विधायकतेकडे मार्गी लावली. ‘हे राज्य व्हावे हितो श्रींची इच्छा’ असे   समूहाशक्ती समोर भगवंताचे अधिष्ठान ठेवले . म्हणून महाराजांनंतर ,संभाजीराजान्नंतर मराठी शक्ती स्वराज्य टिकवण्यासाठी लढत राहिली.
.
असे ऐक्य , अशी सुसूत्रता आपल्यात निर्माण व्हावी यासाठी आपण प्रार्थनेत म्हणतो 

‘होती अनेक हृदये जरी एकरूप सामर्थ्य तेथ प्रकटेल तरी अमूप’
‘होती अनेक हृदये जरी एकरूप’ हे आपल्या गटात उतरावयाचे असेल तर एका तालात चालता यायला हवे ;एका सुरात आणि स्वरात गाता यायला हवे; एकत्र काम करता यावे लागेल. 
.
सैनिकांच्या तुकडीला अपेक्षित परिणाम साधायचा असेल , एखाद्या  खेळाच्या  खेळाडूंच्या संचाला यश मिळवायचे असेल तर तो गट संघरूपात  बांधलेला असावा लागेल. युद्धभूमीवर एकीची भावना निर्माण होण्यासाठी घोषणा दिल्या जातात ,हर हर महादेवची गर्जना केली जाते,समरनृत्य केले जाते .  प्रबोधाकांमधील  समूहशक्ती जागृत करण्यासाठी ‘होती अनेक हृदये जरी एकरूप’ ची आठवण प्रार्थनेच्या वेळी स्वतःला करुन द्यावी लागेलच पण त्याबरोबर आपण सर्वजण एका उद्दिष्टाने बांधले जाण्यासाठी दलावर संचालनाच्या वेळी एका तालात चालता यायला हवे, सुसुस्त्रतेत ;तालावर बरची नृत्य करता यावे लागेल , समुहाने पद्य गावी लागतील . असे अनेक उपक्रम आपण ‘होती अनेक हृदये जरी एकरूप’ हे प्रत्यक्षात येण्यासाठी करतो . यातूनच आपले सामर्थ्य  प्रकट होईल . या सामर्थ्याचा वापर कसा करायचा याचा स्वतंत्र विचार करु  .
.
माझ्या मनात मुळात अजून ऐक प्रश्न आहे. समूहाचा हा एकजिनसीपणा, एकजीवता, एकरूपता ,एकतानता हि नैसर्गिक असते  का कृत्रिम निर्माण झालेली  असेल ?
.
हे ऐक्य , हे संतुलन नैसर्गिक असते . त्याचे पूर्ण एकत्र अस्तिव ‘एक’ म्हणून प्रगट होते. पक्षांचा थवा उडताना कसा ‘एक’ म्हणून उडतो . प्रत्येकाला स्वतंत्र अस्तिव असते पण थवा म्हणून  ‘एक’ स्वतंत्र अस्तित्व आहे. शरीरातील प्रत्येक पेशी वेगळी आहे पण सर्वांची मिळून ‘एक’ आकृती आहे. या अस्तित्वात  एक संतुलन आहे. हे संतुलन निसर्गातील प्रत्येक रचनेत दिसून येते. चंद्र पृथ्वी बरोबर संतुलन साधत ऐक्य साधतो .सर्व ग्रह ,आकाश गंगा नव्हे विश्व रचनेतील सर्व घटकात  हे ऐक्य व संतुलन दिसून येते . शरीराच्या तापमानात एका अंश बदल झाला तरी सर्व बिघडते , एक पेशी जरी वेगळे काम करायला लागली तरी कर्क रोगाकडे प्रवास सुरु होतो. 
.
उपासनेतील मंत्र म्हणताना आपण एकत्वाचा;संतुलनाचा  विचार करतो व याचे आपल्यात प्रगटीकरण करायचा संकल्प करण्यासाठी ‘समानी व आकूति: ...’     ‘जर दोन हृदये एकत्र येतील तर .........’ ही प्रार्थना म्हणतो . प्रार्थनेच्या वेळी ;उपासनेच्या वेळी याची आठवण केल्यास आपणास संघ म्हणून उत्तुंग पराक्रम करता येईल .आपले समर्थ योग्य दिशेने वापरता येईल .

संगच्छध्वं संवदध्वं
सं वो मनांसि जानताम्
देवा भागं यथा पूर्वे
ञ्जानाना उपासते ||
May you move in harmony, speak in one voice;
let your minds be in agreement;
just as the ancient gods shared their portion of sacrifice.
समानो मन्त्र: समिति: समानी
समानं मन: सहचित्तमेषाम्  
समानं मन्त्रमभिमन्त्रये व:
समानेन वो हविषा जुहोमि ||
May our purpose be the same; may we all be of one mind.
 In order for such unity to form I offer a common prayer.
समानी व आकूति: समाना हृदयानि व:|
समानमस्तु वो मनो यथा व: सुसहासति ||
May our intentions and aspirations be alike,
so that a common objective unifies us all.

प्रशांत दिवेकर
शनिवार ,१२/१०/२०१३
ज्ञान प्रबोधिनी प्रशाला , पुणे  
उपासनेनंतरचे प्रगट चिंतन 

Friday, September 20, 2013

good links

Dear Prashant,

Here is a link to the video on the Majuli School where Ravi worked.

In the Land of Satra - Majuli   http://youtu.be/04uIhzVmB-U 

Apte

 Good Article


The Beautiful River or The Battleground?
http://sandrp.wordpress.com/2013/07/17/brahmaputra-the-beautiful-river-or-the-battleground/

Saturday, September 7, 2013

महाराष्ट्रातील शिक्षकाचे भगीरथ प्रयत्न

 विवेकानंद केंद्र विद्यालय ,दिब्रुगड चे प्राचार्य श्री.रवी सावदेकर यांचावर शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेले सदर खाली देता आहे. आमच्या माजुली भेटीच्या वेळची दोन छायाचित्रे सोबत जोडली आहेत. 
प्रशांत

महाराष्ट्रातील शिक्षकाचे भगीरथ प्रयत्न 



आज शिक्षक दिन

नीरज पंडित , मुंबई 

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/--/articleshow/22306394.cms?#write

शाळा उभारण्याचे काम हे अवघडच ; त्यातही ती आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीजवळच्या एका बेटावर उभारणे हे तर दिव्य काम ! पण प्रचंड जिद्द आणि अपार इच्छाशक्तीच्या जोरावर रवींद्रनाथ सावड्येकर यांनी हे काम शक्य करून दाखवले . त्यांनी उभारलेल्या शाळेत आज शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असून सावड्येकरांच्या या कार्यामुळे आसामच्या एका छोट्याशा बेटावरील विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा मिळाली आहे .

स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या रवींद्रनाथ यांनी सटाणा येथे आपले एमएससीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर विवेकानंद केंद्रातील शिक्षण विभागात काम सुरू केले . त्यांना हे काम इतके आवडले की स्वतःहून अनेक उपक्रम हाती घेणे त्यांनी सुरू केले . त्यांची इच्छाशक्ती आणि जिद्द पाहून विवेकानंद केंद्राने त्यांना आसाम येथे ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातल्या माजुली बेटावर शाळा उभारण्याची जबाबदारी दिली .

भाड्याने घेतलेल्या एका मातीच्या खोलीत १७ जून २००२मध्ये या बेटावरची पहिलीवहिली सीबीएसईची शाळा सुरू झाली . शाळेत अवघे ५३ विद्यार्थी होते . बेटावरील गावात शाळेची इमारत उभारणे मोठे आव्हान होते . अनेक भौगोलिक तसेच सांस्कृतिक अडचणी पार केल्यानंतर बेटावर शाळेची पक्की इमारत उभी राहिली . आज दहा वर्षांनंतर या शाळेत पाचशेच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत असून येथे ५० विद्यार्थ्यांना राहता येईल , असे हॉस्टेलही उभारण्यात आले आहे .

माजुली बेटावर उभे राहिले विद्येचे मंदिर

ब्रह्मपुत्रा नदीखोऱ्याजवळचे माजुली बेट बांधकामांसाठी अत्यंत अवघड असेच होते . बेटावर गाळ असल्याने तेथे पक्की बांधकामे जवळजवळ नव्हतीच . पण या बेटावर शिक्षण प्रसाराचे आव्हान स्वीकारलेल्या रवींद्रनाथ सावड्येकरांनी अरुणाचल प्रदेशातून खडीसाठी दगड मागवले . ते फोडण्यासाठी कारागीर आणले आणि अथक प्रयत्नांनंतर बेटावर विद्येचे मंदिर उभे केले .

शाळेची पक्की इमारत बांधायची असेल बांधकामात खडी वापरणे आवश्यक होते . पण , बेटावर बांधकाम करणाऱ्यांनी खडी मिळणार नाहीत , असे स्पष्ट सांगितले . अरुणाचल प्रदेशमधून खडी आणण्याचे ठरले . पण , छोटी खडी आणणे त्रासदायक असल्याने बोटींमधून मोठे दगड आणले . बेटावरील कारागिरांना खडी फोडण्याचा अनुभव नसल्यामुळे ती फोडण्यासाठी ३०० किमी अंतरावरून कारागीर मागविले आणि माजुली बेटावर खडी आणि सिमेंटने तयार केलेली पहिली इमारत उभी राहिली .

आसाममधील हे बेट सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जात असले तरी तेथे म्हणावा तसा विकास होत नव्हता . मिशिंग जमातीमधील विद्यार्थ्यांना शाळेत आणणे हे आव्हान होते . तेही त्यांनी पेलले . शाळेचे व्यवस्थापन स्थानिक लोकांची समिती आणि विवेकानंद केंद्र सांभाळत असून शाळेतील मुलांनी राष्ट्रीय पातळीपर्यंतच्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे . रवींद्रनाथ सध्या दिब्रुगड येथील विवेकानंद केंद्राच्या शाळेत मुख्याध्यापक आहेत